सामाजिक कार्यकर्त्या मिनाताई उलेमाले यांच्या वतीने स्वातंत्र्य दिनानिमित्त विवीध सामाजिक उपक्रमांचे आयोजन.

सामाजिक कार्यकर्त्या मिनाताई उलेमाले यांच्या वतीने स्वातंत्र्य दिनानिमित्त विवीध सामाजिक उपक्रमांचे आयोजन.

स्वतः परीसर निर्जंतुक करुन नागरिकांना करीत आहेत आवाहन
वाशीम: (टिम वत्सगुल्म लाईव्ह) कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गत ५ महिन्यांपासून सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. एकेकाळी कोरोना सर्वात कमी रुग्ण संख्या असलेल्या वाशीम जिल्ह्याने ऑगस्टच्या मध्यापर्यंत कोरोनाच्या १००० रुग्ण संख्येचा आकाडा पार केला असून लॉकडाऊनमध्ये दिलेल्या शिथिलतेचा नागरीकांनी गैरफायदा घेतल्यामुळेच कोरोनाचा एवढा झपाट्याने प्रसार झाला असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्त्या मिनाताई उलेमाले यांनी केले आहे.

दरम्यान ७४ व्या भारतीय  स्वातंत्र्य दिनाच्या औचित्यावर वाशीम शहरातील विविध वसाहतीमध्ये मिनाताई उलेमाले मित्र मंडळानी निर्जंतुकीकरण करून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर योग्य ती खबरदारी घेण्यासाठी आवाहन केले आहे. लॉकडाऊन काळात युथ फाऊंडेशनच्यावतीने  रक्तदान शिबिराचे आयोजनासह गरजूंना धान्य व किराणा किट  वाटप करून मिनाताईनी सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. लॉकडाऊन शिथील झाल्यावर वाशीम जिल्ह्यात कोरोनाची रुग्ण संख्या वाढल्यामुळे परीसर निर्जंतुकीकरणाची मोहीम राबविण्यात येत आहे. दरम्यान स्वतः हातात पाईप घेऊन परीसर सॅनिटाईज करनाऱ्या मिनाताईंच्या कार्याचे पंचायत समिती सभापती रेश्मा गायकवाड यांनी कौतुक करून त्यांना सदिच्छा भेट दिली. यावेळी अखिलेश उलेमाले,प्रा.कैलास खासभागे, विशाल कालापाड, गजानन इंगोले, ऋषिकेश उलेमाले, महेश जाधवसह गोपाल कवर यांची उपस्थिती होती.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने